सातारा हा औरंगाबाद मनपाच्या एका टोकाला येणारा परिसर. पेशवेकालीन खंडोबा मंदिरासाठी तो प्रसिद्ध आहे. याच साताऱ्यातील ही टेकडी- 'वन ट्री हिल'. सुरुवातीला नाव थोडं विचित्र वाटलं. पण, गुगलवर हेच नाव दिलय. लांबून पाहिल्यास या टेकडीच्या माथ्यावर एकच झाड शोभून दिसते त्यामुळेच हौशी लोकांनी त्याला 'वन ट्री हील' म्हटले असावे. औरंगाबादेत बऱ्याच डोंगरांना लेण्या आहेत, तसेच एक लेणे याही डोंगरालाही पाहायला मिळते. एका झाडाव्यतिरिक्त या ठिकाणचा माथा पूर्णतः सपाट आहे. पण, शहराचे संपूर्ण रूप येथून पाहता येते. चढाई फक्त पंधरा मिनिटांची! सध्या या टेकडीवर झाडे लावण्याचा उपक्रम केला गेलाय. अर्थात टेकडीला मल्टी-ट्री हिल बनवलं जातंय. परंतु, यंदाच्या दुष्काळी उन्हाळ्यात तो कितपत यशस्वी यात शंकाच आहे.
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...
बहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....
Sunday, January 20, 2019
'वन ट्री हिल', औरंगाबाद
लेबल्स
औरंगाबाद,
औरंगाबाद जिल्हा,
टेकडी,
डोंगर
प्रतिक्रिया |
Wednesday, January 16, 2019
छोटेखानी दुर्ग : मच्छिन्द्रगड, जि. सांगली
सांगली जिल्ह्यातील एक सुंदर किल्ला म्हणजे मच्छिन्द्रगड! शिवरायांनी स्वतः जातीने बांधून घेतलेला किल्ला म्हणून हा दुर्ग परिचित आहे. इस्लामपूर पासून पंधरा किलोमीटरवर हा किल्ला स्थित आहे. बेरडमाची आणि येडेमच्छिन्द्र या दोन्ही गावांतून किल्ल्यावर जायला भक्कम पायरीवाटा आहेत. शिवाय येडेमच्छिन्द्र मधून काँक्रीट चा गाडीरस्ताही तयार झालेला आहे. किल्ल्याचे अवशेष अजूनही बऱ्यापैकी शिल्लक दिसतात.
लेबल्स
किल्ला,
गड,
मच्छिन्द्रगड,
वाळवा तालुका,
शिवाजी महाराज,
सांगली जिल्हा
प्रतिक्रिया |
Tuesday, January 1, 2019
ढाकोबा डोंगूर
लेबल्स
किल्ला,
जुन्नर तालुका,
डोंगर,
ढाकोबा,
पुणे जिल्हा,
शिखर
प्रतिक्रिया |
Tuesday, October 16, 2018
नारायणेश्वर, पुरंदर
हेमाडपंथी मंदिरे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाच्या स्थानी आहेत. शिवाची हजारो प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आपल्या राज्यात पाहायला मिळतात. यातील मोठ्या प्रमाणातील मंदिरे ही उपेक्षित आहेत. एका अर्थाने हे बरंच आहे. त्यामुळे त्यांची मूळ रचना टिकून आहे आणि बाजारीकरणही झालेले नाही. अनेक मंदिरांना आधुनिक पद्धतीची रंगरंगोटी करून एकप्रकारे विद्रूपच केलं आहे. अनेक गावांत आपले मंदिर किती प्राचीन आहे, याची जाणीवही गावकऱ्यांना नाही. असेच एक मंदिर पुरंदर तालुक्यात नारायणपूर गावात आहे... ते नारायणेश्वर महादेवाचे....!!!
या मंदिरामुळे गावाला हे नाव मिळाले असले तरी, ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे सर्वाना ज्ञात आहे. कधी पुरंदर किल्ल्याच्या भेटीस गेल्यास इथे नक्की भेट द्या.
या मंदिरामुळे गावाला हे नाव मिळाले असले तरी, ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे सर्वाना ज्ञात आहे. कधी पुरंदर किल्ल्याच्या भेटीस गेल्यास इथे नक्की भेट द्या.
लेबल्स
नारायणेश्वर,
पुणे जिल्हा,
पुरंदर तालुका,
मंदिर,
महादेव,
हेमाडपंथी
प्रतिक्रिया |
Wednesday, August 29, 2018
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान : किल्ले देवगिरी
महाराष्ट्राच्या
इतिहासातील एक सुवर्णपान औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याच्या इतिहासाने
लिहिलं गेलंय. आज आपल्या राज्यात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला
हा एक दुर्ग... किल्ला कसा असावा, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देवगिरी
किल्ल्याकडे पाहता येईल. आठशे वर्षे अन अनेक लढाया पाहिलेल्या ह्या
छोटेखानी दुर्गात अनेक रहस्ये दडली आहेत! परकीय आक्रमकांनी या किल्ल्याचे
नाव कालांतराने बदलल्याने सध्या तो बहुतांशी त्याच नावाने ओळखला जातो.
नाशिकहून पहिल्यांदा औरंगाबादला आलो तेव्हा प्रथमच हा दुर्ग नजरेस पडला होता. तेव्हा देवगिरी किल्ला हाच, याची माहिती मात्र नव्हती. कालांतराने गेल्या चार-पाच वर्षांत त्याबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले. या काळात त्याचे जसे वर्णन ऐकले होते तसाच हा किल्ला आहे. इतिहास डोळ्यासमोर ठेवून तो एक किल्ला म्हणून पहिला तर अधिकच भावतो. कधी औरंगाबादला गेलात तर देवगिरी किल्ला नक्की पाहा... स्वच्छ नजरेने!
नाशिकहून पहिल्यांदा औरंगाबादला आलो तेव्हा प्रथमच हा दुर्ग नजरेस पडला होता. तेव्हा देवगिरी किल्ला हाच, याची माहिती मात्र नव्हती. कालांतराने गेल्या चार-पाच वर्षांत त्याबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले. या काळात त्याचे जसे वर्णन ऐकले होते तसाच हा किल्ला आहे. इतिहास डोळ्यासमोर ठेवून तो एक किल्ला म्हणून पहिला तर अधिकच भावतो. कधी औरंगाबादला गेलात तर देवगिरी किल्ला नक्की पाहा... स्वच्छ नजरेने!
लेबल्स
औरंगाबाद जिल्हा,
किल्ला,
देवगिरी,
दौलताबाद,
मुघल
प्रतिक्रिया |
Subscribe to:
Posts (Atom)